TOD Marathi

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Press Conference of DCM Devendra Fadnavis) घेत महाराष्ट्र राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारच कशा पद्धतीने जबाबदार आहे, याचा पाढा वाचला. यासाठी विविध उदाहरणे आणि वृत्तपत्र कात्रण आणि बैठकांचे संदर्भही त्यांनी दिले. एकंदरीत सर्वच प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि त्यांचे धोरण कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray attacked CM and DCM in Press Conference) यांनी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह पत्रकार परिषद घेत चांगलाच पलटवार केला.

राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलायला हवे मात्र उपमुख्यमंत्री बोलतात याचा अर्थ खरे पॉवर कुणाकडे आहेत हे समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री या विषयावर बोलायला तयार असतील तर मुख्यमंत्र्यांसोबत वन-टू-वन डिबेट करायला मी तयार आहे, (I am ready to do debate with CM, Says Aditya Thackeray) असं म्हणत एक प्रमुख कार्य मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.

आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे: 

  • महाराष्ट्र मागे गेला असं म्हणता तर तसं दाखवून द्या
  • मुख्यमंत्र्यांसोबत एका व्यासपीठावर चर्चेसाठी तयार
  • वेदांता फॉक्स कॉन आणि फॉक्स कॉन हे दोन्ही प्रकल्प वेगळे
  • मे 2022 मध्ये फॉक्सकॉनने भेट दिली
  • आमच्या काळात केंद्राशी चांगले संबंध होते
  • आमचं सरकार असतं तर बल्क ड्रग प्रकल्प महाराष्ट्रात आला असता
  • आंदोलनकर्त्या बेरोजगार मुलांना फडणवीस शेंबडी पोरं म्हणतात
  • राजकीय कार्यकर्त्यांसाठी समृद्धी महामार्ग खुलामक जनतेसाठी का नाही?
  • महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचा गाजर दिलं गेलं
  • महाराष्ट्राच्या हक्काचा केंद्राकडून का नाही आणलं?
  • खोके सरकार मुळे राज्य मागे पडतंय
  • फडणवीसांनी आरोप करण्यापेक्षा कंपनीच्या त्या अधिकाऱ्यांची नाव स्पष्टपणे सांगावी